वीस वर्षांपूर्वी पोचवायला हवी असलेली पत्र जेव्हा एखाद्या पोस्टमनला अचानक अनपेक्षितपणे सापडत असतील तेव्हा काय होत असेल? दोन दशकांच्या काळात पत्र ज्यांच्यापर्यंत पोहोचायला हवी होती त्यांचं पुढे काय झालं असेल? आणि आत्ता त्यांना ही पत्र पोहोचवली तर त्यांना काय वाटेल? हे सारे प्रश्न तुम्हाला पडलेत ना? मग हे पुस्तक जरूर वाचा. या साऱ्या प्रश्नांची उत्तरं नक्की मिळतील.